सर्वांसाठी धोका जातिय आतंकवाद ...
जातियवाद ही फक्त दलित समाजाची ससमस्या आहे असे समजणे हे असंवेदनशील, असंस्कृत आणि अनैतिक आहे. त्यामुळे सर्व समाजाने अशा अनैतिकतेतून बाहेर पडून जातीपातींचा अहंकार नष्ट करण्याच्या चळवळीत सामील होणे ही आजची ताबडतोबीची गरज आहे. 'देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर त्यात अस्पृश्यांचे स्थान काय असेल?' असा प्रश्न बाबासाहेब आंबेडकरांनी स्वातंत्र्यचळवळीच्या काळात नेहमीच विचारला होता. 'स्वातंत्र्य मिळाल्यानंतरही माझ्या अस्पृश्य बांधवांवर असेच अत्याचार सुरू राहतील, अशी भीती मला कधी कधी वाटते,' असेही बाबासाहेब अनेक वेळा म्हणाले. स्वातंत्र्योत्तर काळात एका बाजूला दलितांच्या सामाजिक आणि आर्थिक उन्नतीसाठी शासनाने घेतलेल्या विविध कार्यक्रमांचा परिणाम म्हणून काही प्रमाणात दलितांची प्रगती होत असताना, दुसऱ्या बाजूला मात्र देशाच्या सर्व भागांत दलितांवर विविध अन्याय-अत्याचारांची परंपरा अखंड सुरूच आहे. अत्याचाराबाबतची बाबासाहेबांची भीती खरी ठरली आहे. केंद्र सरकारच्या गृहमंत्रालयाच्या वतीने, प्रत्येक वर्षी, समाजातील विविध घटकांवर वेगवेगळ्या राज्यांत होणाऱ्या गुन्ह्यांची आकडेवारी प्रसिद्ध होते. त्