फेरीवाल्यांचे वाढत्या साम्राज्याला जवाबदार कोण?
मनसे नी झोपलेल्या प्रशासनाला जागविण्याचा कार्य केला असला तरी ही फेरीवल्याना हटवण्याची जबादारी ही कोणत्याही राजकीय पक्ष संघटण्याचे नसून ही जबाबदारी पालिकेची आहेच तसेच फेरीवाल्यांचा रेल्वे स्थानक परिसरात वाढलेल्या विळख्याला तेवढाच जवाबदार रेल्वे पोलीस प्रशासन ही आहे ! कारण फेरीवाल्यांचे हप्त्याचें धागे दोरे हे फक्त पालिका प्रशासन कर्मचारी अधिकाऱ्यानं पर्यंत नसून यात रेल्वे पोलीस प्रशासनिक अधिकाऱ्यांचा ही समावेश असतोच एखाद्या राजकीय किंवा फक्त नावाने समाजसेवक अश्या व्यक्तींच्या मध्यस्थी द्वारे हा सगळं काळा - पिवळा कारभार सत्ताधारी राजकीय नेत्यांच्या आशीर्वादाने चालत असतो. ज्याने हे स्पष्ट होते की एल्फिन्स्टन रोड सारख्या होणाऱ्या दुर्घटनेला कारणीभूत पालिका प्रशासना सोबत रेल्वे व स्टेशन बाहय पोलीस यंत्रणा सह काही सत्ताधरी राजकीय नेते मंडळी ही आहेत. या सर्वांचीच जवाबदारी आहे फेरीवल्याना हटविण्याची.ज्याने करून स्टेशन परिसरात कोणत्याही प्रकारची अप्रिय घटना न घडत फेरीवल्या मुळे प्रचंड ट्रॅफिक व नागरिकांना होणार त्रास कमी होईल . शाम गौड सामाजिक कार्यकर्ता (छत्रपती युंवा फ्रंट)